Ticker

6/recent/ticker-posts

...म्हणून माझ्या डोक्यावर टोपी कायम राहिली; सत्तारांनी उलगडले रहस्य

अहमदनगर: डोक्यावरची टोपी ही राजकारण्यांची ओळख मानली जाते. मात्र, अशी टोपी घालणारे राजकीय नेते आता खूपच कमी उरलेत. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे (Shiv Sena) राज्यमंत्री () अशा टोपीवाल्या राजकारण्यांपैकी एक आहेत. मात्र, मधल्या काळात त्यांनी ही टोपी उतरविण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्यांनी एक निश्चियही केला होता. अर्थात बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे सारेच बदलले आणि सत्तारांच्या डोक्यावरील टोपीचा मुक्काम वाढला. खुद्द सत्तार यांनीच तालुक्यातील एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला. श्रीरामपूर तालुका पंचायत समितीच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी सत्तार आले होते. यावेळी त्यांनी त्याचे जुने मित्र भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना शिवसेनेत येण्याची ऑफरही दिली. शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मी गोड आंब्याच्या झाडाखाली आलो तर विखे मात्र बाभळीच्या झाडाखाली गेले, अशा शब्दांत त्यांनी भाजप आणि शिवसेनेची तुलनाही केली. वाचा: टोपीचा किस्सा त्यांनी सांगितला. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगरपालिकेच्या मागील निवडणुकीचा संदर्भ याला आहे. सत्तार काँग्रेसमध्ये असताना सिल्लोडमधील त्यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी इतर पक्ष आणि नेते एकत्र आले होते. मात्र, त्यांना यश आले नाही. सत्तार यांनी सत्ता कायम राखली. त्यावेळी भाजपचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर सत्तार यांचा विशेष राग होता. दानवे यांचा पराभव केल्याशिवाय डोक्यावरील टोपी उतरविणार नाही, अशी शपथ सत्तार यांनी त्यावेळी घेतली होती. वाचा: पुढे राजकीय समीकरणे बदलली. सत्तार यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्या काळात शिवसेनेची भाजपशी युती होती. त्यामुळे दानवेंचा पराभव करणे दूरच त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारीच सत्तार यांच्यावर येऊ पडली. त्यामुळे त्यांच्या टोपीचा मुक्काम कायम राहिला. आता हा किस्सा सांगताना सत्तार यांनी याला विखे यांचाही संदर्भ दिला. आता राजकारण बदलले असल्याने टोपी उतरविण्यासाठी पुन्हा प्रयत्न करता येतील. मात्र, विखे यांच्यामुळे आपल्या डोक्यावरील टोपी लवकर उतरेल असे वाटत नाही. एकीकडे मित्र तर दुसरीकडे पक्ष अशी विखेंची कोंडी झाली आहे. विखे यांच्यासोबत आपणही भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्यासाठी निघालो होतो, मात्र, काही कारणांमुळे ते झाले नाही. तसे झाले असते तर आज आपणही पायरीवरच बसलेलो दिसलो असतो, असेही सत्तार म्हणाले आणि नंतर त्यांनी विखे यांनाच शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fr1iQM

Post a Comment

0 Comments