बालासोर: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी () भारतीय जनता पक्षाने () आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात (Election Manifesto) मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशात चर्चा सुरू झाली आहे. अनेक विरोधीपक्ष आणि राज्य सरकारांनी या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री () यांनी मोठे वक्तव्य केले आहे. केवळ बिहार राज्यच नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाला करोना लस मोफत (Free ) मिळेल, असे सारंगी यांनी म्हटले आहे. (all indian citizes will get ) केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी हे ओडिशा येथील बालासोरमध्ये बोलत होते. देशातील प्रत्येक नागरिकाला करोना लस मोफत मिळणार असून, एका व्यक्तीला लस उपलब्ध करून देण्यासाठी पाचशे रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. बालासोर येथे पोटनिवडणूक होत असून प्रताप सारंग हे प्रचारासाठी तेथे गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना करोना लशीबाबत चर्चा केली होती. भारतातील वैज्ञानिक लस बनवण्यासाठी प्रयत्न करत असून लवकरच ही लस तयार होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या घोषणेनंतर अनेक राजकीय पक्षांनी भाजपच्या या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. करोनाची लस ही देशातील विधानसभा निवडणुकीप्रमाणे मिळणार आहे का, असे प्रश्न काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी विचारला आहे. सरकारने करोना लशीबाबाबत एक धोरण निश्चित करून संपूर्ण देशाला ती मोफत उपलब्ध करून दिली पाहिजे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत तामिळनाडू, मध्ये प्रदेश, आसाम, पुद्दुचेरीच्या राज्य सरकारांनी आपल्या नागरिकांसाठी मोफत करोना लस देण्याची घोषणा केली आहे. तर संपूर्ण देशातील नागरिकांना मोफत लस द्यावी, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केले आहे. क्लिक करा आणि वाचा- लस वाटप करण्याच्या धोरणावर केंद्र सरकार काम करत असून एका अंदाजानुसार केंद्र सरकारने आतापर्यंत ५० हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज बांधला आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3meM7fY

0 Comments