
जकार्ता: करोनाच्या थैमानासोबत डेंग्यूशी दोन हात करणाऱ्या जगातील अनेक देशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. इंडोनेशियामध्ये डेंग्यूच्या तापाला आळा घालण्याच्यादृष्टीने मोठे यश मिळाले आहे. यामुळे जवळपास ७७ टक्क्यापर्यंत डेंग्यूचा संसर्ग जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. डेंग्यूमुळे दरवर्षी ४० कोटी लोकबाधित होतात आणि जवळपास २५ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू होतो. इंडोनेशियामध्ये शास्त्रज्ञांनी वोलबचिया जीवाणूने बाधित केलेल्या कोट्यवधी मच्छरांना सोडले होते. हा जीवाणू डेंग्यूच्या मच्छरांना विषाणूची बाधा करण्यापासून रोखतात. ज्या ठिकाणी या मच्छरांना सोडण्यात आले त्या ठिकाणी डेंग्यूची प्रकरणे अन्य ठिकाणांच्या तुलनेने जवळपास ७७ टक्के कमी असल्याचे आढळले. योगकर्ता विद्यापीठातील आरोग्य संशोधक अदी उतरिनी यांनी सांगितले की, हे मोठे यश आहे. संशोधनाच्या यशामुळे एक मोठा आशेचा किरण दिसत आहे. वाचा: डेंग्यूच्या संसर्गाचा धोका कमी संशोधकांनी हे खास मच्छर योगकर्ता शहरातील जवळपास १२ ठिकाणी सोडले होते. योगकार्ता शहरात हजारो डेंग्यू रुग्णांच्या तपासणी दरम्यान डेंग्यू बाधितांची संख्या कमी झाले असल्याचे समोर आले आहे. लंडनच्या हायजिन अॅण्ड ट्रॉपिकल मेडिसिनचे तज्ञ निकोलस जेवेल यांनी सांगितले की, या संशोधनातील परिणाम आर्श्चयजनक आहे. आतापर्यंत असे यश कोणत्याही संशोधनाला मिळाले नाही. संसर्गापासून बचाव करण्याचा हा स्तर काही मोजक्याच औषधे, उपकरणांनी गाठला असल्याचे त्यांनी सांगितले. या संशोधनाची सविस्तर माहिती आणि परिणाम लवकरत वैद्यकीय नियतकालिकेत प्रकाशित करण्यात येणार आहे. वाचा: जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगात जवळपास ४० कोटी नागरिकांना डेंग्यूची बाधा होते. यामध्ये भारतातील रुग्णांचीही संख्या मोठी आहे. डेंग्यूमुळे तीव्र स्वरुपाचा ताप येणे, सांधेदुखी, स्नायूंमध्ये वेदना जाणवणे आदी लक्षणे आढळून येतात. मागील ५० वर्षांत डेंग्यूबाधितांच्या संख्येत जवळपास ३० पटीने वाढ झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. वाचा: कसा होतो डेंग्यूचा प्रसार डेंग्यू हा एक प्रकारचा व्हायरल ताप (flu) असतो. डेंग्यू हा मच्छर चावल्याने होतो. डेंग्यूचा प्रसार करणा-या मच्छरांचे बायोलॉजिकल नाव एडीज एजिप्टी असे आहे. सामान्य भाषेत या मच्छरांना टायगर मच्छर असंही म्हटलं जातं. कारण त्यांच्या शरीरावर सफेद आणि काळ्या रेषा असतात. या एडीज मच्छरांची एक खास गोष्ट ही आहे की ते घरातील साफ पाण्यात जन्म घेतात आणि त्यातच अंडीही घालतात. जसं की कूलरमध्ये साठलेलं पाणी, कुंड्यांमध्ये साचलेलं पाणी किंवा पाण्याच्या टाकीत ते जन्मास येतात. साधारणत: हे मच्छर सकाळी आणि दिवसभरात कधीही चावतात. सामान्यत: हा सामान्य डेंग्यू, रक्तस्त्राव डेंग्यू, डेंग्यू शॉक सिंड्रोम या तीन प्रकारांचा असतो. या तिन्ही तापाची लक्षणं त्यांच्या प्रकारानुसार तीव्र होत जातात.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3b9Sr4b
0 Comments