बलिया, उत्तर प्रदेश : बलिया गोळीबारातील मुख्य आरोपी याला अटक करण्यात आलीय. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सनं () लखनऊच्या जनेश्वर मिश्र पार्कमधून धीरेंद्रला रविवारी सकाळी अटक केलीय. घटनेनंतर धीरेंद्र घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याच्यावर ५० हजार रुपयांचं बक्षीसही घोषित करण्यात आलं होतं. बलियातल्या दुर्जनपूर गावात दोन गटांत सरकारी दुकान वाटपावरून झालेल्या वाद आणि भांडणानंतर करण्यात आलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला होता. यापूर्वी आरोपी धीरेंद्र सिंहनं एक व्हिडिओ प्रसिद्ध करत स्वत: निष्पाप असल्याचं सांगितलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, आरोपी भाजप नेता धीरेंद्रनं पोलीस अधिकाऱ्यांसमोर (सीओ आणि एसडीएमच्या उपस्थितीत) जयप्रकाश पाल नावाच्या ४६ वर्षीय व्यक्तीची गोळी झाडून हत्या केली होती. धीरेंद्र सिंह याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे १० गट काम करत होते. आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) आणि गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचं याअगोदरच पोलिसांनी जाहीर केलंय. बलिया गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण पाच लोकांना अटक करण्यात आलीय. वाचा : वाचा : दुसरीकडे, हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी धीरेंद्र सिंहचा बचाव करण्याच्या प्रयत्नात भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह हेदेखील अडचणीत सापडले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी समन्स धाडले आहेत. वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2IGrzP0

0 Comments