अहमदनगर: महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणारे बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाचे नेते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. 'सुशांतसिंहच्या मृत्यूचा वापर करून स्वत:चं राजकीय करियर करू पाहणाऱ्या अभिनेत्रीच्या सुरात सूर मिसळून महाराष्ट्राच्या विरोधात बोलणं सोपं आहे, पण बिहारच्या मूलभूत समस्यांची जबाबदारी घेऊन तिथं सुधारणा करणं कठीण आहे,' असा टोला रोहित पवारांनी हाणला आहे. फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना झापलं आहे. 'कायदा व सुव्यवस्थेची आपल्याला इतकीच चिंता वाटते तर २०१८ मुझफ्फरपूर येथील शेल्टर होममध्ये लहान मुलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल तुम्ही का बोलला नाही? नितीशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही?,' असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. वाचा: नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या माहितीनुसार, बिहारची राजधानी पाटणा खुनांच्या गुन्ह्याच्या बाबतीत देशातील १९ मोठ्या शहरांमध्ये अव्वल आहे. हुंडाबळीच्या गुन्ह्यातील पाटणा पहिल्या क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये राजेंद्र सिंह यांच्यासारख्या पाच आरटीआय कार्यकर्त्यांचा दिवसाढवळ्या खून झाला. अनेक पत्रकारांचे खून झाले. भूमाफियांकडून लोकांना मारणं, घरं जाळण्यासारख्या घटना बिहारमध्ये अगदीच किरकोळ झाल्या आहेत. १५ वर्षांत अर्ध्या डझनाहून अधिक अधिकाऱ्यांचे खून झालेत. मग सामान्य जनतेचे काय हाल होत असतील याची कल्पना करता येऊ शकते. हे सगळं घडत असतानाही तुमचा पक्ष सत्ताधारी आघाडीमध्ये सहभागी कसा?,' याबद्दल रोहित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 'बिहारमध्ये सुधारणा घडवून आणण्याऐवजी राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्रावर टीका करण्याचा सोपा मार्ग तुम्ही अवलंबलाय याचं दु:ख वाटतं. मुंबईत मिळणारी आपुलकी व आत्मीयता तुम्ही स्वत:च्या फिल्मी करिअरच्या दरम्यानही अनुभवली असेल. त्या अनुभवानंतरही तुम्ही अशी भूमिका घेता याचं आश्चर्य वाटतं. केवळ राजकीय लाभासाठी महाराष्ट्रावर केलेली चिखलफेक महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही,' असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33roAAt

0 Comments