Ticker

6/recent/ticker-posts

जाणून घ्या: चीनचे हायब्रीड वॉर म्हणजे काय? अॅप बंदीने आळा बसणार?

बीजिंग: लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकही गोळी न चालवता भारताविरोधात युद्ध पुकारले असल्याचे म्हटले जात आहे. या युद्धाला 'हायब्रिड वॉरफेअर' म्हटले जाते. रशियाने क्रिमीयावर ताबा मिळवण्यासाठी याचा वापर केला असल्याचे म्हटले जाते. चीनच्या या हेरगिरीमध्ये त्यांची झेन्‍हुआ डाटा इन्फॉरमेशन टेक्‍नॉलॉजी कंपनी लिमिटेड (Zhenhua Data)या बिग डेटा कंपनीने मदत केली आहे. जाणून घेऊयात चीनचे हे हायब्रीड वॉर आहे तरी काय? हायब्रीड वॉरफेअर म्हणजे काय? चीनला काय हवंय? चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने १९९९ मध्ये हायब्रीड वॉरफेअरसाठी 'अमर्याद युद्धकौशल्य'च्या नावाखाली एक रणनिती आखली होती. चीनचे कर्नल कीआओ लिआंग आणि कर्नल वांग शिआंगसुई हे या प्रकल्पाचे मास्टरमाइंड असल्याचे म्हटले जाते. या हायब्रीड वॉरफेअरनुसार चीन आपल्या विरोधी देशांमध्ये सामाजिक द्वेष वाढवणे, आर्थिक विकासात अडथळा निर्माण करणे, संस्थात्मक रचनेला, प्रणालीला धोका पोहचवणे, राजकीय नेतृत्वाची बदनामी करणे, त्यांच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे आदी कामे केले जातात. एका सायबर सुरक्षा तज्ञांनी सांगितले की, रशियाने क्रिमीयावर ताबा मिळवल्यानंतर आता बरेच देश हायब्रीड वॉरफेअरचा वापर करत आहे. अर्थात, चीनने हाँगकाँगमध्ये याचा व्यापकपणे वापर केला होता. मात्र, इतर देशांमध्ये याचा वापर केला नसल्याचे म्हटले जाते. वाचा: चिनी अॅप बंदीचा परिणाम नाही भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाल्यानंतर भारताने चीन अॅपवर बंदी घातली. भारताने आतापर्यंत २२४ चिनी अॅपसवर बंदी घातली. या अॅप बंदीमुळे झेन्‍हुआसारख्या चिनी अॅप कंपनीच्या मनसुब्यांवर काहीच परिणाम होणार नाही. शत्रू देशांवर एकही गोळी न झाडता त्याला नामोहरम करणे, प्रभाव वाढवणे, त्यांचे नुकसान करणे आदी बाबी चीनला साध्य करायच्या आहेत. त्याशिवाय चीनला त्या देशात आपला प्रभावही वाढवायचा आहे. फेक न्यूज, प्रतिमा डागाळणे, प्रपोगंडाच्या आधारे शत्रूला नामोहरम करण्याची चीनची रणनिती आहे. वाचा: चीनने सोशल मीडियाच्या आधारे अमेरिका आणि युरोपमधील देशांतील सैन्य, आर्थिक बाबींसह इतर अति संवेदनशील माहिती जमा करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी चीनला अमेरिका अथवा इतर देशांमध्ये कार्यालय सुरू करण्याचीही आवश्यकता नाही. चिनी कंपनीकडून लोकशाहीवादी देशांमधील नियमांचा फायदा घेऊन माहिती जमा केली असल्याचे तज्ञांनी म्हटले. वाचा: वाचा: Zhenhua कंपनीने भारतात काय केले? ही चिनी कंपनी एकमेकांशी संबंधित असलेलीही माहिती जमा करते. यामध्ये व्यक्ती, संस्था आणि माहिती यांच्यातील संबंधाची नोंद ठेवण्यात येते. हा महाकाय डेटाबेस तयार करण्यामागे चीनचा एक उद्देश आहे. लक्ष्य केलेल्या संबंधित व्यक्तीबद्दल जनतेत नेमके काय वातावरण आहे, त्यांचा कल कसा आहे, याबाबतची माहिती जमा करण्यात येते. त्या व्यक्तीच्या पोस्टवर कोणत्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत, किती लाइक्स, शेअर येत आहेत याचे विश्लेषण केले जाते. त्याशिवाय कृत्रिम बुद्धिमतेच्या आधारे त्या व्यक्तीच्या भौगोलिक स्थानाचीही माहिती घेतली जाते. अशा प्रकारची माहिती जमा करण्याचा उद्देश्य घातक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. या 'हायब्रीड वॉरफेअर'मध्ये निष्णात असल्याचा दावा या चिनी कंपनीकडून करण्यात येतो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32s3JxJ

Post a Comment

0 Comments