Ticker

6/recent/ticker-posts

भारदस्त व्यक्तिमत्वाचा अभिनेता गेला; रवी पटवर्धन यांचे निधन

ठाणे: मराठी रंगभूमीसह, आपल्या अभिनयाने चित्ररटसृष्टी गाजवणारे (Ravi Patwardhan Passes Away) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. पटवर्धन यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ( ravi patwardhan passes away at 83) काल रात्री रवी पटवर्धन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. पटवर्धन यांना मार्च महिन्यात देखील हृदयविकाराचा झटका आला होता. 'अग्गबाई अरेच्च्या' ही त्यांची शेवटची मालिका ठरली रवी पटवर्धन यांचा ६ सप्टेंबर १९३७ रोजी जन्म झाला. मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपट सृष्टी गाजवल्यानंतर रवी पटवर्धन यांनी छोट्या पडद्यावर देखील आपला ठसा उमटवला. त्यांच्या झुपकेदार मिशा आणि जरब बसवणारा आवाज हा त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला अगदी साजेसा होता. आपल्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे त्यांनी गावचा पाटील, पोलिस आयुक्त आणि न्यायाधीस अशाबरोबर अनेक खलनायकी भूमिका साकारल्या. पटवर्धन यांनी दीडशेहून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी २०० हून अधिक चित्रपट केले आहेत. विशेष म्हणजे सन १९७४ मध्ये रत्नाकर मतकरी यांच्यासोबत आरण्यक या नाटकात पहिल्यांदा काम केले. त्यानंतर वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांनी या नाटकात धृतराष्ट्राचीच भूमिका साकारली. 'अग्गबाई अरेच्च्या' ही त्यांची शेवटची मालिका ठरली. वयामुळे त्यांना विस्मरणाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्राचे देखील धडे घेतले. विशेष म्हणजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ केले आणि शृंगेरी मठाच्या परीक्षेला देखील बसले. या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3qAEJyC

Post a Comment

0 Comments