नवी दिल्ली: भारतात रुग्णांमध्ये ( patients) वाढ होऊन ती संख्या ९४.६२ लाखांवर पोहोचली आहे. या रुग्णांपैकी एकूण ८८ लाख ८९ हजार ५८५ रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) आज सोमवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ३१ हजार ११८ नवे रुग्ण आढळले आहेत. या बरोबरच देशात एकूण करोनाबाधितांची संख्या ९४ लाख ६२ हजार ८०९ वर पोहोचली. तर गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४८२ रुग्ण मृत्युमुखी पडले. या बरोबर देशात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पोहोचली १ लाख ३७ ६२१ वर. देशातील ८८,८९,५८५ रुग्ण बरे झाल्यानंतर आता रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो ९३.९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोविडमुळे होणारा मृत्युदर १.४५ टक्क्यांवर आहे. देशात आजच्या घडीला चे ४ लाख ३५ हजार ६०३ आहेत. ही संख्या एकूण रुग्णांच्या ४.६ टक्के इतकी आहे. म्हणजेच, या रुग्णांवर एकतर रुग्णालयात उपचार सुरू आहे किंवा मग डॉक्टरांच्या देखरेखीखाली काही रुग्ण घरी उपचार घेत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबरपर्यंत १४ कोटी १३ लाख ४९ हजार २९८ इतक्या चाचण्या घेण्यात आल्या. यांमध्ये ९ लाख ६९ हजार ३२२ नमुन्यांच्या चाचण्या सोमवारी करण्यात आल्या. क्लिक करा आणि वाचा- भारतात ७ ऑगस्ट या दिवशी करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २० लाख, तर २३ ऑगस्टला ३० लाख होती. तर ५ सप्टेंबरला ही संख्या ४० लाखांच्या पुढे पोहोचली होती. तर एकूण रुग्णसंख्या १६ सप्टेंबरला ५० लाख, २८ सप्टेंबरला ६० लाख, ११ ऑक्टोबरला ७० लाख, २९ ऑक्टोबरला ८० लाख आणि २० नोव्हेंबरला ९० लाखांच्या पुढे पोहोचली होती. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ms3udw

0 Comments