नाशिक: महावितरणच्या गलथान कारभाराचा मोठा फटका जिल्ह्यातील तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना बसला आहे. शॉर्टसर्किटमुळं या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला असून त्यामुळं सुमारे २० लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील डांगसौदाणे इथल्या दिगंबर धर्मा बोरसे यांच्या शेतातील सात एकर क्षेत्रावरील तर, वंदना काकुळते यांचा दोन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झालाय. या शेतकऱ्यांनी संपूर्ण क्षेत्रात आडसाली उसाची लागवड केली होती. थोड्याच दिवसात हा ऊस कारखान्यात गाळपासाठी नेला जाणार होता. मात्र, त्याआधीच ही दुर्घटना घडली आहे. आगीमुळं या ऊसामध्ये केलेले ठिबक सिंचनही पूर्णपणे जळाले आहे. वाचा: बोरसे यांच्या शेतात वीजेच्या तारांचे मोठे जाळे आहे. या तारा शेतात लोंबकळल्याने बोरसे यांनी वीज वितरणच्या कार्यालयात जाऊन तक्रारही दिली होती. मात्र स्थानिक कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अद्याप पंचनामा केलेला नाही. नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करून लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mLSqb8

0 Comments