पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात शासकीय महापूजेसाठी आलेले उपमुख्यमंत्री यांना आज पत्रकारांच्या एका अनपेक्षित प्रश्नाला सामोरं जावं लागलं. अर्थात, अजित पवार यांनीही हजरजबाबीपणे या प्रश्नाला उत्तर दिलं. अजित पवार यांनी आज पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह विठुरायाची शासकीय महापूजा केली. 'करोनाची लस लवकर येऊ दे आणि संपूर्ण जग करोनामुक्त होऊ दे', असं साकडं अजित पवारांनी पांडुरंगाला घातलं. पूजेनंतर प्रथेप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी अजित पवारांना गाठले व प्रश्नांची सरबत्ती केली. वाचा: राजकीय प्रश्नांना उत्तर देण्याचं अजित पवार यांनी यावेळी टाळलं. 'विठ्ठलाच्या दारात कुठलीही राजकीय मागणी करायची नसतात. विरोधात असलेल्या प्रत्येकाला सरकारमध्ये जावंसं वाटतं. आम्ही विरोधात असताना आम्हालाही तसं वाटायचं. त्यामुळं आता विरोधात असणाऱ्यांनाही तसं वाटणार. हे सगळं चालत असतं. राजकीय गोष्टींमध्ये पांडुरंगाला ओढायचं काही कारण नाही,' असं अजित पवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. प्रतिवर्षी आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा करण्याची प्रथा आहे. तर, कार्तिकी एकादशीला हा मान उपमुख्यमंत्र्यांना मिळतो. त्यानुसार, आज अजित पवारांनी ही पूजा केली. त्याच अनुषंगानं पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला. कार्तिकीची पूजा करण्याचा मान आपल्याला अनेकदा मिळाला आहे. आषाढी एकादशीला पूजा करण्याचा योग कधी येणार? थोडक्यात, आपण मुख्यमंत्री कधी होणार असा तो प्रश्न होता. त्यावर, 'पांडुरंगाच्या आशीर्वादानं जे काही मिळतं, त्यात समाधान मानून पुढं जायचं असतं. आपलं काम करत राहायचं असतं,' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. वाचा: वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3q3d216

0 Comments