दुबई: Points Table युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या १३वा हंगाम अर्धा झाला आहे. स्पर्धेतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून प्रत्येक संघाचे ७ सामने झाले आहेत. स्पर्धेत दोन संघांची सर्वाधिक चर्चा होत आहे. पहिला संघ म्हणजे होय जो गुणतक्त्यात शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे तर दुसरा संघ म्हणजे जो दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई संघाची कामगिरी आतापर्यंत त्यांच्या लैकिकाला साजेशी अशी झालेली नाही. तर दिल्ली संघाने अनेक दिग्गजांना धक्का देत अनपेक्षितपणे दुसरे स्थान मिळवले आहे. सध्या गुणतक्त्यात गेल्या वर्षाचे विजेते () १० गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स () तितक्याच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईची सरासरी + १.३२७ तर दिल्लीची +१.०३८ इतकी आहे. तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bangalore) असून त्यांचे देखील १० गुण आहेत पण सरासरी -०.११६ इतकी आहे. या तिनही संघांनी प्रत्येकी पाच विजय आणि दोन सामन्यात पराभव स्विकारला आहे. चौथ्या स्थानावर कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) असून त्यांनी ७ पैकी ४ विजयांसह ८ गुण मिळवले आहेत. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी ७ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान संघने (Rajasthan Royals) देखील ३ विजय मिळवले आहेत. पण ते गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर आहेत. त्यांची सरासरी -०.८७२ इतकी तर हैदराबादची +०.१५३ इतकी आहे. सातव्या क्रमांकावर एक अनपेक्षित असे नाव म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज () होय. सर्व साधारपणे हा संघ पहिल्या चारमध्ये हमखास असतो. पण या वर्षी तो ७ पैकी २ सामन्यातील विजयासह तळातून दुसऱ्या स्थानावर आहे. तर किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) च्या नावावर फक्त एक विजय असून ते अखेरच्या स्थानावर आहेत. कोण जाणार प्लेऑफमध्ये... प्लेऑफ (IPL Playoffs) मध्ये पोहोचण्यासाठी किमान १४ गुणांची गरज असते. सध्याच्या गुणतक्त्यावर नजर टाकता मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू या संघांना पुढील ७ पैकी दोन सामन्यात विजय मिळवला तरी पुरेसे ठरू शकते. अर्थात अन्य संघांनी जर काही मोठा उलटफेर केला नाही तर १४ गुण मिळवणारा संघ चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर पुढे प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो. खरी स्पर्धा प्लेऑफमधील चौथ्या संघासाठी असेल ज्यासाठी कोलताता, हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात अधिक चुरस होतील. धोनीच्या चेन्नई संघाने २०१०च्या आयपीएलमध्ये केलेला चमत्कार पुन्हा केला तर या तिन्ही संघांना प्लेऑफमध्ये जागा मिळणार नाही. अर्थात त्यासाठी चेन्नईला ७ पैकी ५ ते ६ सामने जिंकावे लागतील.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dkIIZP

0 Comments