Ticker

6/recent/ticker-posts

भारत चीन तणाव : द्विपक्षीय परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पाच मुद्यांवर सहमती

नवी दिल्ली : भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या तणावादरम्यान दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर वास्तविक सीमा रेषेवर तणाव कमी करण्यासाठी पाच मुद्यांवर दोन्ही पक्षांची सहमती झाल्याचं समजतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान भारतानं चीनला खडे बोलही सुनावले. चिनी सेनेची कारवाई द्विपक्षीय कराराचं उल्लंघन दर्शवते, असंही भारतानं चीनला सुनावलं. शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) बैठकी दरम्यान भारताचे एस जयशंकर () आणि चीनचे परराष्ट्रमंत्री () यांची रशियाची राजधानी मॉस्को इथं ही बैठक झाली. उल्लेखनीय म्हणजे, याच ठिकाणी गेल्या शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि चीनचे चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंगे (Wei Fenghe) यांच्यातही चर्चा झाली होती. या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री यांनी वांग यी यांच्यासमोर चीनला सीमेवरून आपल्या सैनिकांची संख्या कमी करावी लागेल, असं ठणकावलं. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या या बैठकीत पाच सूत्रीय फॉर्म्युलावर चर्चा झाली. यानुसार, तणाव कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९७५ नंतर पहिल्यांदाच सप्टेंबर २०२० मध्ये दोन्ही देशांत गोळीबाराची घटना घडली होती. यावर, दोन्ही देशांकडून मोकळेपणाने चर्चा करण्याची आणि चर्चेतून मार्ग काढण्यासंबंधी चर्चा झाली. या चर्चेनंतर दोन्ही पक्षांकडून एक पाच मुद्यांचं वक्तव्य जारी करण्यात आलंय. पाच मुद्यांवर सहमती १. दोन्ही देशांनी आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा पुढे न्यायला हवी आणि मतभेदांचं वादात रुपांतर होणार नाही याची काळजी घ्यायला हवी २. सीमेवर दिसणारी सध्याची परिस्थिती दोन्ही देशांसाठी योग्य नाही, अशावेळी सेनेदरम्यानही चर्चा सुरू राहील आणि सीमेवर वाद निवळण्याचा वातावरण तयार केलं जाईल ३. दोन्ही देशा भारत - चीन दरम्यान सीमेच्या मुद्यावर झालेल्या करारांचं पालन करणार आणि शांतीपूर्ण वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतील ४. सीमा वादानंतर विशेष प्रतिनिधींदरम्यान चर्चा सुरू राहील ५. परिसरात शांती स्थापित झाल्यानंतर दोन्ही देश आपापल्या संबंधांना पुढे नेण्याचं काम करतील संबंधित बातम्या : वाचा : वाचा : वाचा : वाचा : भारतीय लष्कर आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) दरम्यान मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच निर्माण झालेला पूर्व लडाख भागात वास्तविक नियंत्रण रेषेवर तणाव आजही कायम आहे. लडाखमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरूच ठेवण्याचा या बैठकी मागचा हेतू आहे. चुशूल, डेपसांग आणि पँगाँग सरोवराच्या परिसरासह सीमेवरील इतर भागांमध्ये तणाव विकोपाला गेला आहे. चिनी सैनिकांकडून भारतीय क्षेत्रात घुसखोरी करण्याचा सतत प्रयत्न केला. २९ - ३० ऑगस्टच्या रात्री चीनी सैनिकांनी पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील भागात घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला. इतर बातम्या : वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3bMvwvN

Post a Comment

0 Comments