नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी करोना () आणि लॉकडाउनच्या () मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आज बुधवारी एक व्हिडिओ शेअर करत हा हल्लाबोल केला आहे. देशात अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाउन हा असंघठीत कामगारांसाठी () एक मृत्युदंड सिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसचे करोनाशी लढा देण्यासाठी सरकारची तयारी आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणेसाठी उचलल्या जात असलेल्या पावलांबाबतही त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ( criticizes ) राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये लिहितात, 'अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाउन असंघटित वर्गासाठी मृत्युदंड सिद्ध झाला आहे. २१ दिवसांत करोना संपण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र कोट्यवधी रोजगार आणि छोटे उद्योग संपले. मोदीजींचा जनविरोधी 'डिझास्टर प्लान' जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.' राहुल गांधी आपल्या व्हिडिओत म्हणतात की, 'करोनाच्या नावावर असंघटित क्षेत्रावर तिसरे आक्रमण, तिसरा वार होता, कारण गरीब लोक रोज कमावतात आणि रोज खातात. छोट्या आणि मध्यम वर्गाच्या व्यापाऱ्यांचेही असेच आहे. तुम्ही कोणतीही पूर्व कल्पना न देताच लॉकडाउन लागू केले याचा अर्थच त्यांच्यावर आक्रममण केले. करोनाविरोधातील ही २१ दिवसांची लढाई असेल असे पंतप्रधान म्हणाले, मात्र असंघटित क्षेत्राची कणाच २१ दिवसात तुटला.' राहुल गांधी यांनी या व्हिडिओत काँग्रेसच्या न्याय योजनेचे समर्थन केले. लॉकडाउननंतर आता सर्वकाही सुरू होण्याची वेळ आली आहे. गरिबांना मदत करावी लागेल, न्याय योजनेसारखी एक योजना लागू करावी लागेल, बँकेच्या खात्यात थेट पैसे टाकावे लागतील, असे काँग्रेस पक्षाने वारंवार म्हटले आहे. मात्र असे केले गेले नाही. छोट्या आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योगांसाठी एक पॅकेज तयार करावे, त्यांना वाचवण्याची आवश्यकता आहे, असेही आम्ही म्हटले होते. पैशांशिवाय ते वाचू शकणार नाही, मात्र सरकारने काहीच केले नाही. उलट सरकारने सर्वात श्रीमंत पंधरा-वीस लोकांचा वीस लाख कोटी रुपयांचा कर माफ केला, असे राहुल गांधी म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- लॉकडाउन हे आक्रमण असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले, लॉकडाउन हे करोनावरील आक्रमण नसून ते देशातील गरिबांवरील, युवकांवरी, मजुरांवरील, शेतकऱ्यांवरील आणि छोट्या व्यापाऱ्यांवरील आक्रमण होते. हे आमच्या असंघटित अर्थव्यवस्थेवरील आक्रमण होते. ही बाब आपल्याला समजून घेतली पाहिजे आणि या आक्रमणाविरोधात सर्वांना एक होऊन लढावे लागेल, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hazcZC

0 Comments