नवी दिल्ली : भारत आणि चीन दरम्यान वाढत्या सीमा वादादरम्यान भारताचे एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बैठकी झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीतही वातावरण तापल्याचे दिसले. सीमेवर घडणाऱ्या घडामोडींवर तोडगा काढला जाईल परंतु द्विपक्षीय संबंध साधारण ठेवण्यावर चीनकडून जोर दिला जात होता. यावर भारताचे परराष्ट्र मंत्री यांनी मात्र आक्रमक भूमिका घेत चीनला कडक शब्दांत इशारा दिला. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर बैठकीतही वातावरण तापल्याचं चित्रं होतं. चीनची सेना पूर्णत: मागे हटत नाही तोपर्यंत भारतीय सेना मागे हटणार नाही, असे एस जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले. वास्तविक नियंत्रण रेषेवर गोळीबार का करण्यात आला? भारतीय सैनिक आणि उपकरणांना नुकसान का पोहचवण्यात आले? चीनची ही कारवाई १९९३ आणि १९९६ च्या करारांचे थेट उल्लंघन होते. १५ जून रोजी चीनकडून करण्यात आलेल्या कारवाई मुळेच दोन्ही देशांच्या जवानांत रक्तरंजित संघर्ष घडला, असे अनेक मुद्दे उपस्थित करत भारताने चीनला खडसावले, असे या बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना म्हटले आहे. वाचा : वाचा : भारताची भूमिका -चीनच्या सैन्यतैनातीने भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली - चीनच्या चिथावणीखोर भूमिकेने आतापर्यंतच्या कराराचा आणि शिष्टाचाराचा भंग - सीमावर्ती भागात एकतर्फी स्थिती बदलण्यास विरोध - संघर्ष होत असलेल्या भागातून चीनने तातडीने माघार घ्यावी - दोन्ही देशातील संबंध पुढे नेण्यासाठी सीमेवरील शांतता व स्थिती गरजेची वाचा : वाचा : तणाव संपविण्यासाठी भारत-चीनचे पाऊल पूर्व लडाखच्या सीमेवरील तणाव संपुष्टात आणण्यासाठी चीनने सर्वप्रथम तेथील सर्व पॉइंटस्वरील सैन्य मागे घ्यावे, असे स्पष्ट आणि ठाम भूमिका भारताने चीनसमोर मांडली आहे. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चर्चेत ही भूमिका मांडण्यात आली असून, दोन्ही देशांमध्ये शुक्रवारी पाच मुद्यांवर सहमती झाली. तत्पूर्वी, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेत चीनच्या आक्रमक भूमिकेने संबंधांवर परिणाम होत असल्याचे भारताने स्पष्ट केले. मॉस्कोमधील शांघाय सहकार्य परिषदेदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात गुरुवारी रात्री चर्चा झाली. त्यात, उभय देशांचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी सीमावादावर तोडगा आवश्यक आहे. लडाखच्या घटनेमुळे द्विपक्षीय संबंधांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी लष्कराची तैनाती हा चिंतेचा विषय आहे. १९९३ आणि १९९६ च्या कराराचे उल्लंघन करीत एवढ्या मोठ्या संख्येने केलेल्या सैन्याच्या तैनातीवर चीनला विश्वासार्ह स्पष्टीकरण या बैठकीत देता आले नाही. भारतीय सैन्याने सर्व करार आणि शिष्टाचाराचे प्रामाणिकपणे पालन केले आहे, मात्र चीनकडून कराराचे पालन होत नाही, अशी तीव्र नाराजी जयशंकर यांनी व्यक्त केली. वाचा : वाचा : पंचसूत्रीत काय ठरले? - उभय सैन्यांनी चर्चा सुरू ठेवावी, उचित अंतर कायम राखावे - सीमेसंबंधातील सर्व विद्यमान करार आणि शिष्टाचार बंधनकारक - तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये - सीमाप्रश्नावर चर्चा सुरू राहतील - विश्वास वाढविण्यासाठी नवे उपाय वाचा : वाचा : अडीच तासांच्या चर्चेअंती उभय देशांची पाच मुद्यांवर सहमती दर्शविणारे एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. मतभेदांचे पर्यवसान वादामध्ये होऊ देण्याचे टाळून भारत-चीन संबंध विकसित करण्यावर उभय देशांच्या नेत्यांनी घडवून आणलेल्या सहमतीच्या मालिकेपासून प्रेरणा घ्यावी. सीमावर्ती भागांमध्ये विद्यमान स्थिती कोणाच्याही हिताची नाही. उभय सैन्यांनी चर्चा सुरू ठेवावी, उचित अंतर कायम राखावे आणि तणाव कमी करण्यासाठी पावले उचलावीत, सीमेसंबंधातील सर्व विद्यमान करार आणि शिष्टाचार दोन्ही पक्षांना बंधनकारक असतील. दोन्ही पक्षांनी सीमावर्ती भागात शांतता कायम ठेवताना तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये. दोन्ही पक्ष विशेष प्रतिनिधीच्या यंत्रणेमार्फत संवाद साधत राहतील, सीमाप्रश्नावर सल्लामसलत आणि समन्वयासाठी बैठकी सुरू राहतील, सीमेवरील तणाव निवळताच शांतता कायम राखण्यासाठी नव्या परस्पर विश्वास वाढविण्याचे उपाय पूर्णत्वाला नेण्यासाठी वेग प्रदान करण्यात येईल, अशा पाच सूत्रीवर भारत आणि चीनची सहमती झाली. या पाच सूत्री सहमतीनंतर सीमावर्ती भागांच्या व्यवस्थापनाविषयीच्या सर्व करारांचे पूर्ण पालन होईल, अशी आशा जयशंकर यांनी वांग यी यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत तणावात आणखी भर पाडू इच्छित नसून, भारताच्या चीनविषयक धोरणात कोणताही बदल झालेला नाही, असे भारताने स्पष्ट केले. उभय देशांदरम्यानच्या सीमावादावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर, तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करी आणि मुत्सद्देगिरीच्या पातळीवर वाटाघाटी सुरू ठेवण्यावर सहमती झाली. सीमावाद सोडविण्यासाठी जी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे त्या माध्यमातून चर्चा होईल. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी विश्वासवर्धन उपायांवर काम करावे लागेल. भविष्यात कुठलीही अप्रिय घटना रोखण्यासाठी जिथे संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे अशा स्थानांवरून उभय देशांच्या सैन्यांच्या माघारीला प्राधान्य देण्यात आले आहे. दोन्ही देशांमध्ये अतिशय गहन चर्चेअंती विद्यमान स्थितीविषयी पाच सूत्री सहमती झाली आहे. शेजारी देश असल्यामुळे काही मुद्यांवर असहमती होणे स्वाभाविक असले तरी त्याकडे योग्य दृष्टीने पाहिले पाहिजे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. चीन आणि भारताचे संबंध जोपर्यंत योग्य दिशेने वाटचाल करतील तोपर्यंत काहीही समस्या येणार नाही. असे कोणतेही आव्हान नाही, ज्यावर तोडगा काढला जाऊ शकत नाही, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले आहे. वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3bPZW0k

0 Comments